
भरत मोरे / प्रयागराज
दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभ मेळ्याचे (Prayagraj kumbhmela) काय आहे महत्व? तर, प्रयागराजमध्ये यंदा १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्यक्ष कुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मामध्ये या उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रयागराजमध्ये कोट्यवधी भविकांची मांदियाळी जमली आहे.
१३ जानेवारी २०२५ पासून उत्तरप्रदेशातील कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरा असलेला हा उत्सव आहे.
हजारो वर्षांपासून हा कुंभमेळा आयोजीत केला जातो. यामागे पौराणिक, धार्मिक आणि खगोलीय कारणे असल्याचे सांगितले जाते. कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात.
समुद्रमंथन हा हिंदू धर्मातील पुराणकथांमधील महत्वाचा ठेवा आहे. देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केल्याची आख्यायिका सांगितली जाते.
या समुद्रमंथनामधून अमृत कलश बाहेर आला. हा अमृत कलश दैत्यांपासून वाचविण्यासाठी प्रयत्न केले. हा कलश घेऊन देव पळू लागले.
त्यावेळी अमृताचे काही थेंब जमीनीवर पडले. हे अमृताचे थेंब ज्या ठिकाणी पडले, त्या चार ठिकाणांवर कुंभवेळा आयोजित करण्यात येतो.
हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. अमृताचे थेंब हरिद्वारच्या ब्रह्म कुंडात, उज्जैनमध्ये शिप्र नदीच्या काठावर आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी पडला होता.
कुंभमेळ्याच्या माध्यमातून भक्तगण किंवा श्रद्धाळू आत्मशुद्धी करून घेण्यासाठी तीर्थक्षेत्रावर स्नान करण्यासाठी येतात. या स्नान करण्याने पापक्षालन होतो अशी श्रद्धा आहे.
कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते, पापांचा नाश होवून मोक्ष प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं जातं.
कुंभमेळा म्हणजे साधू-संत, गुरु, भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान, भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
कुंभमेळ्याच्या बारा वर्षांनंतरच्या तारखा खगोलीय घटनांवर आधारलेल्या असतात. गुरू ग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे.
गुरू ग्रह ज्यावेळी कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो, तेव्हा कुंभमेळा आयोजीत केला जातो.
गुरु ग्रहाला त्याच्या कक्षेत येण्यासाठी १२ वर्षांचा कालावधी लागतो, म्हणून कुंभमेळा दर १२ वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. (Prayagraj kumbhmela)
ज्योतिष शास्त्रात १२ राशी असतात. या १२ राशी १२ महिने दर्शवितात. या राशी वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधीत आहेत.
कुंभ राशीत गुरू आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजीत केला जातो. त्याचबरोबर १२ वर्षांचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तन करतं.
हा कालावधी आत्मशुद्धी, श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो.
नाव बदलून शादी डॉट कॉमवर नोंदणी… फिरोज शेखकडून तब्बल २५ महिलांची फसवणूक
स्वामी विवेकानंदांचे विचार भारताला ‘विश्वगुरू’ बनवू शकतात